Saturday, April 18, 2020

मौलाना मिर्झा तबलिगवर टिका करून देशप्रेम सिद्ध करा!


उरूस, 18 एप्रिल 2020

तबलिग आणि शाहिनबाग यावर टीका केली की आमचे औरंगाबादचे मित्र मौलाना मिर्झा अब्दूल कय्युम नदवी हिंदूंच्या विविध बातम्यांची कात्रणं क्लिप फेसबुक पोस्ट टाकून याचा तूम्ही निषेध करणार का असा प्रश्‍न विचारत होते. त्यांनी पाठवलेल्या बातम्यांत बहुतांश फेक न्युज असल्याने त्याची दखल घेण्याची मला कधी आवश्यकता वाटली नाही.

पण काल दोन मोठ्या हिंदूंशी निगडीत घटनांची सत्यता पटली. त्यावर बहुतांश हिंदू पत्रकारांनीही टीका केली. पहिली घटना होती माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या नातवाच्या लग्नाची. ज्याला किमान 200 ते 250 लोक जमा झाले होते. दुसरी घटना कर्नाटकातीलच आहे. कलबुर्गी येथील सिद्धलिंगेश्वर स्वामी रथयात्रेत मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. या दोन्ही घटनांचा निषेध मी स्वत: केला. माझ्या फेसबुक पोस्टवर तात्काळ निषेध करण्यासाठी बहुतांश हिंदू मित्र तातडीने पुढे आले. 

कुणीही या देशविघातक कृत्याला पाठीशी घालू पहात नव्हता. कुणीही याची वकिली केली नाही. माझ्या मित्र यादीतील आणि त्यांच्याही यादीतील कुणीही या दोन घटनांचे समर्थन करण्यासाठी पुढे आला नाही. सर्वांनीच एकजात निषेध केला.

मौलाना मिर्झा यांनी आवाहन केले होते की तूम्ही हिंदूंच्या अशा घटनांचा निषेध करून दाखवा. तो आम्ही करून दाखवला. आता मौलाना अब्दूल कय्युम नदवी यांना आवाहन आहे की त्यांनी तबलिगचा जाहिररित्या निषेध करून दाखवावा. त्यांना मी रात्रीच मेसेज पाठवला. त्यांनी अजूनही त्याची दखल घेतली नाही. 12 तास त्यांच्या उत्तराची मी वाट पाहून ही फेसबुक पोस्ट टाकत आहे.

काही पुरोगामी मुसलमान मित्रांनी तबलिगचा निषेध केला आहे. आपल्या कृतीतून आपण कधीच असल्या कट्टरपंथीयांच्या पाठीशी नाहीत हा स्पष्ट संदेश दिला आहे. पण ही संख्या अतिशय अल्प आहे. बहुसंख्य मुसलमान हा शांत बसून या तबलिगी कट्टरवादाला पाठीशी घालत आहे.

याचा सगळ्यात मोठा तोटा मुसलमानांनाच होणार आहे. तबलिगी प्रवृत्तीमुळे मुसलमान जगाच्या मागे पडत जातील. विज्ञान तंत्रज्ञान विरोधी ठरतील. त्यांच्या विकासाचा मार्ग खुंटून जाईल. आज तबलिगींनी पसरवलेल्या कोरोना महामारीचा धोका तर मुस्लीम वस्त्यांनाच जास्त आहे. कुठलाच तबलिगी काही मंदिरात जावून लपून बसणार नाही. तो लपतो आहे तो मस्जीदमध्येच अथवा मुस्लीम वस्तीमध्येच. तेंव्हा हा धोका ओळखून सारासार विचार करणार्‍या मुसलमान बंधू भगिनींनी पुढे यावे. या सगळ्या लपलेल्या तबलिगींना समोर आणावे. त्यांची वैद्यकिय तपासणी करून घ्यावी. स्वत:ला असलेला धोका दूर करावा. तसेच देशाला असलेला धोकाही दूर करावा.

आम्ही कायम तबलिगी जमात असाच शब्द वापरत आलो आहोत. तबलिगींमुळे सर्व मुसलमान बदनाम होत आहेत. आणि ही चूक त्यांचीच आहे. तेंव्हा आता या धोक्यापासून देशाला वाचविण्यासाठी विवेकी मुसलमानांनी पुढे येण्याची गरज आहे.

मौलाना मिर्झा अब्दूल कय्युम नदवी तबलिगचा जाहिर निषेध करून तूमचे देशप्रेम सिद्ध करा.

श्रीकांत उमरीकर, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 9422878575   

1 comment:

  1. हिंदू लोक अश्या गोष्टीचा विरोध करायला नेहमीच समोर येतात पण मुस्लिम लोक अश्या गोष्टीचा विरोध करत नाहीत...स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे सुशिक्षित लोक जर असे करत असतील तर अशिक्षित लोकांकडून आपण काय अपेक्षा करणार??? जर ताब्लिकी जमात वर टीका केल्याने जर मुसलमान बदनाम होत असतील तर मग RSS आणि विश्व हिंदू परिषदेवर टीका केल्याने हिंदू पण बदनाम होतात... जर कायदा सगळयांना समान असेल तर मग एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक असे तर नाही ना जमणार...

    ReplyDelete