Saturday, May 4, 2013

हनी सिंग-बलात्कारी मानसिकतेचा गायक । ‘सखिमंच’वाला ‘लोकमत’ त्याचा प्रयोजक ॥

दै, कृषीवलच्या ‘उरूस’ सदरातील माझा लेख 4 मे 2013

हनी सिंग हा पंजाबी पॉप गायक सध्या फार गाजतो आहे. तरूण-तरूणींमध्ये त्याची लोकप्रियता फार जास्त आहे. गाण्याच्या बाबत नेहमी असं होतं की त्याच्या ठेक्याकडे, सुरांकडे सगळ्यांचे लक्ष जाते पण त्यामानाने शब्दांकडे लक्ष जात नाही. हनी सिंग याच्या गाण्यातून स्त्रीचे दुय्यम स्थान स्पष्टपणे दिसत असते. ब्रेक अप पार्टी सारख्या गाण्यात ही प्रेयसी दुसर्‍यासोबत संसार करते. पोरं वाढवते. नवर्‍याला खाउ पिउ घालते. काही कामधंदा नसल्यामुळे सास-बहूच्या सिरीअल्स टीव्हीवर पहात बसते. त्यावर हनी सिंगचे गाणे लागले की पोरांना सांगते, ‘‘तेंव्हाच याचे ऐकले असते तर हाच तूमचा बाप असला असता’’. वगैरे वगैरे....
निदान अशा गाण्यात स्त्रीला दिलेलं दुय्यम स्थान अस्पष्ट तरी आहे. नविन काही गाण्यांमध्ये तर फारच विकृत पद्धतीनं स्त्रीचं वर्णन केल्या गेलेलं आहे. गाणी अश्लिल आहेत हा तर आक्षेप आहेच. पण आजकाल अश्लिलतेवर फार टिका करण्यातही अर्थ उरलेला नाही कारण इंटरनेटवर सगळंच खुलं झालेलं आहे. अश्लिल चित्रफिती सर्रास उपलब्ध आहेत. लहान मुलंही हे सगळं पहात असतात. त्या पार्श्वभूमीवर हनी सिंगच्या अश्लिल गाण्यावर काय आक्षेप घेणार. आक्षेप आहे तो त्यात स्त्रीवर अत्याचार करण्याची जी मानसिकता वर्णन केली आहे त्यावर आहे.
सोळा सतरा वर्षाच्या मुलीला हा म्हणतो की तूझे आत्तापर्यंत हजारो जणांशी शरिरि संबंध आले असतील. आता थोडा जरी गणिती हिशोब लावला तर हजार जण म्हणजे हजार दिवस. म्हणजे ही मुलगी वयाच्या 13व्या वर्षांपासून शरिर संबंध ठेवते आहे असं हनी सिंगला म्हणायचे आहे की काय? बरं या ‘हजारो’शी यमक जुळवायला पुढचे शब्द आहेत ‘महंगी महेंगी कमरोंमे, बडी कारोंमे, बॉलिवुडके बडे बडे सितारोंने’.
यातला आक्षेपार्ह भाग लक्षात घ्या. दिल्ली आणि भारतभरच्या महिलांवरील अत्याचारासंदर्भात असं निदर्शनास आले आहे की हे अत्याचार अलिशान गाड्यांमध्ये झाले आहेत. परिणामी या गाड्यांच्या काचा पारदर्शकच असाव्यात, त्यांना आतील काही दिसू नसे अशा गडद फिल्म लावू नयेत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आणि हनी सिंग मोठ्या गाड्यांमधील शरिर संबंधांचे वर्णन मिटक्या मारत करतो आहे. महेंगी महेंगी कमरोंमे म्हणजे पंचतारांकित हॉटेलांमध्ये. यावरही परत आक्षेप आहे. विजय मल्या सारख्या उद्योगपतींनी आपल्या मोठ्या कंपन्या बुडवल्या व पैसे अय्याशी सारखे नग्न पोरींच्या कॅलेंडरवर, आयपीएल मध्ये नाचणार्‍या चिअर गर्ल्सवर आणि पंचतारांकित हॉटेलांवर उडवले असा आरोपच वित्तीय संस्थांनी लावला आहे. बॉलिवुडके बडे बडे सितारोंमे यावर काय बोलणार? बॉलिवुडचं चारित्र्य शेंबड्या पोरांनाही माहित असतं. हनी सिंग या सगळ्याचं समर्थन आपल्या गाण्यातून करतो आहे.
शरिर संबंध झाल्यानंतर ‘तूझको जूतोंसे मारू’ अशी भावना या गाण्यांमधून येते आहे. परत दिल्लीच्या अत्याचारांचा संदर्भ इथे आहे. ज्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले त्यांच्यावर नुस्ता बलात्कारच झाला असे नाही तर त्यांच्यावर शारिरीक अत्याचार केले गेले. या सगळ्या विकृतींचे चविष्ट वर्णन हनी सिंगच्या गाण्यातून येते याला काय म्हणायचं?
माणसाच्या संस्कृतिचा विकास मारून खाण्यापासून (शिकार) पेरून खाण्यापर्यंत (शेती) झाला. या संस्कृतीचा कळस म्हणजे माणसाला कला अवगत झाली. म्हणजे आहार निद्रा भय मैथून या भावनांवर नियंत्रण मिळवून माणूस जनावराचा ‘माणूस’ झाला आणि त्याचा सर्वोच्च पुरावा म्हणजे कला. आणि याच कलेचा आधार घेवून परत हनी सिंग सारखा गायक हजारो वर्षे मागे जावून माणसाला परत पशुच्या पातळीवर नेउन त्याचं समर्थन करतो आहे.
याच हनी सिंग याच्या गाण्याचा कार्यक्रम मोठा गाजावाजा करून ‘लोकमत’ वृत्तपत्रसमुहाने औरंगाबादच्या गरवारे स्टेडियम वर ठेवला होता. हा तर मोठाच विरोधाभास झाला. इकडे महिलांसाठी ‘सखीमंच’ सारखे उपक्रम चालवायचे आणि दुसरीकडे बलात्कारी मानसिकतेच्या हनी सिंगचे कार्यक्रम ठेवायचे. याला काय म्हणावं? या वृत्तपत्र समुहाचे प्रमुख विजय दर्डा हे कॉंग्रेसचे खासदार आहेत. त्यांचे बंधु राजेंद्र दर्डा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जबाबदार मंत्री आहेत. विजय दर्डा यांच्या पत्नी ज्योत्स्ना दर्डा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांनी ‘सखीमंच’ च्या माध्यमातून स्त्रीयांसाठी केलेल्या कामाचा उल्लेख बर्‍याच मान्यवरांनी आणि ‘लोकमत’च्या लाभार्थी विद्वानांनी केला. पण या कुणालाही असा प्रश्न पडला नाही की नुकतंच बलात्कारी मानसिकतेच्या हनी सिंगचा कार्यक्रम याच लोकमत समुहाने आयोजित केला होता. त्याची मोठी जाहिरात महिनोंन महिने शहरात झळकत होती.
हा विषय फक्त हनी सिंगपाशीच थांबत नाही. आता तर इंटरनेटवर हनी सिंगपासून प्रेरणा घेवून अशा गाण्यांची लाटच आली आहे. अगदी उघडपणे ‘मै हू बलात्कारी’ सारखी गाणी येत आहेत.
स्त्रीभृ्रणहत्या आणि त्यानंतरचे महिलांवरील भयानक अत्याचार यांनी वातावरण दुषित झालेलं असताना संगीताच्या माध्यमातून या सगळ्या विकृतीला चालना देण्याचं काम अशी गाणी करत आहेत. आणि बरेच तरूण या गाण्यांना प्रतिसाद देत आहेत. यातील सगळ्यात भयानक बाब म्हणजे मुलांसोबतच मुलीही मोठ्या प्रमाणात हनी सिंग यांच्या चाहत्या आहेत. औरंगाबादच्या कार्यक्रमात बर्‍यापैकी संख्येने तरूण मुली उपस्थित होत्या हे समजल्यावर माझ्यासारख्याला धक्काच पोंचला. एरव्ही महिला संघटना अशा घटनांसंदर्भात फार जागरूकता दाखवतात. मग त्यांनी हनी सिंगच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मुलींबाबत काय धोरण स्विकारले? का जे शाब्दिक बलात्कार हनी सिंग आपल्या गाण्यातून करतो आहे त्याला त्यांची संमती आहे. काय समजायचं काय?
1 मे रोजी महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिन होता. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला 53 वर्षे पुर्ण झाली. या वर्षांत आम्ही पंजाबी हनी सिंगला बोलवून त्याच्या विकृत गाण्याचे कार्यक्रम महाराष्ट्रात करतो आहोत, त्याला ‘लोकमत’ सारखा सगळ्यात मोठा म्हणवून घेणारा वृत्तपत्र समुह प्रयोजकत्व देतो आहे ही कोणती मानसिकता आहे?
हनी सिंगच्या अश्लिल गाण्यातील शरिराची भाषा ही जागतिक भाषा असते तीला प्रदेशाचे बंधन नसते असले ‘उदात्त’ विचार लोकमतच्या धोरण ठरविणार्‍यांनी केले की काय?
5 मे 1911 रोजी महाराष्ट्रातील एक तरूण तेंव्हाच्या अखंड भारतातील पंजाबात जातो. लाहोर मध्ये ‘गांधर्व महाविद्यालया’ची स्थापना करतो. ‘हिंदूस्थानी संगीता’च्या शिक्षणाची गंगोत्री म्हणजे हे गांधर्व महाविद्यालय. त्या तरूणाचे नाव पं. विष्णू दिगंबर पलूस्कर. सगळ्या भारतभर फिरून संगीताचा अभ्यास करून दुसरा एक महाराष्ट्रीय तरूण ‘हिंदुस्थानी गायन पद्धती’ या प्रचंड ग्रंथाचे लेखन करतो. त्याचे नाव पं. विष्णू नारायण भातखंडे.
1 मेला संयुक्त महाराष्ट्राचा वर्धापन दिन साजरा होत असताना, मराठी वृत्तपत्र सृष्टीत नं.1 चे बिरूद मिरवणारा ‘लोकमत’ याच पंजाबमधील बलात्कारी मानसिकतेच्या गायकाचे कार्यक्रम आयोजित करतो आहे. ज्यांच्या सांगितीक पुण्याईवर उभं राहून हा हिडीसपणा करतो आहोत आणि प्रचंड प्रमाणात पैसा कमावतो आहोत त्या पलूस्कर भातखंडेचे नाव तरी हनी सिंगला माहित असेल का? हनी सिंग तर सोडा, तो तर पंजाबी आहे, स्वत:ला महाराष्ट्रीय म्हणवून घेणार्‍या ‘दर्डा’ बंधूंना तरी असं वाटलं का गांधर्व महाविद्यालयाच्या 112 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आपण काही कार्यक्रम साजरा करावा?
शंभर वर्षांपूर्वी मराठी माणूस पंजाबात जावून संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. आणि 100 वर्षांनंतर पंजाबी माणूस भरपूर मानधन घेवून महाराष्ट्रात येवून याच संगीताच्या आडून बलात्कारी मानसिकता महाराष्ट्राला दाखवतो.
दिलीपकुमारच्या चित्रपटातील गाणे आहे, महम्मद रफीने गायलेले
रामचंद्र कह गये सिया से ।ऐसा कलयुग आयेगा।
हंस चुनेगा दाना दुनका । कौव्वा मोती खायेगा॥
सगळ्या जागरूक नागरिकांनी, संघटनांनी हनी सिंग यांच्या गाण्यावर बहिष्कार टाकावा, तसेच त्यांना प्रयोजकत्व देणार्‍या ‘लोकमत’लाही लोकांचे मत नेमके कशाच्यामागे आहे हे दाखवून आपली कलाविषयक जाण प्रगल्भ असल्याचा पुरावा द्यावा.

श्रीकांत उमरीकर, मो. 9422878575.

1 comment:

  1. प्रिय श्रीकांत,
    यदि आपने थोड़ी भी जांच की होती तो आपको पता चल जाता कि; हनी सिंघ ने ऐसे किसी भी गाने को गाने से इंकार किया है. सफलता कई दुश्मनों को जन्म देती है. उसका यही कहना है कि उभरते हुए उसके करियर को तबाह करने के लिए उसके प्रतिस्पर्धी ही ऐसी अफवाहें फैला रहे है. लिंक नीचे दे रहा हूं.
    http://www.rediff.com/movies/report/honey-singh-i-havent-sung-those-offensive-songs/20130102.htm
    आज हनी सिंघ भारत का सबसे महंगा गायक कलाकार है. यह सफलता उसने बेहद कम उम्र में काफी मेहनत से हासिल की है.
    रहा सवाल लोकमत द्वारा ऐसे कलाकार के कायर्क्रम का प्रायोजक बनने का तो यहाँ भी सवाल यही आता है कि क्या आप और मै किसी कलाकार के कार्यक्रम पर नैतिक पोलिस का रोल करने के लिए स्वतंत्र है? हम अपने आपको स्वतंत्रता-वादी भी कहते है और नैतिक पोलिस की भूमिका भी निभाना चाहते है, यह नहीं हो सकता. फिर हमारे में और बाकी की हुल्लड ब्रिगेड में क्या अंतर रह जायेगा?
    यदि कलाकार कोई गलती करता भी है, जो कि इस मामले में अभी तक निश्चित नहीं है, तब भी हम केवल उसकी रचना का विरोध कर सकते है, व्यक्ति का नहीं.
    इस देश में ऐसे अनुत्पादक गधो की कमी नहीं है जो स्वयं तो कुछ नहीं करते पर दूसरों की निर्मिती पर बवाल उठाते रहते है. जो पर्यावरण से लेकर प्रत्येक मुद्दे पर सफलता विरोधी नीतियां अपनाते है. जो साहित्यकारों का साहित्य समझे बगैर उसे बंद करने के लिए मोर्चे निकालते है, जो इतिहास के गड़े मुर्दे उखाड़ उखाड़ कर वर्तमान के सभा सम्मलेन उध्वस्त करने का प्रयास करते है. जिनके लिए जिंदगी केवल अतीत का बार बार पुननिर्माण मात्र है, कुछ नया करने का अवसर नहीं. जिनकी जिंदगी में कोई चुनौती या यात्रा नहीं है, बस एक जानलेवा ठहराव है.
    ऐसे नैतिकतावादियों के कारण समूचा मध्य-पूर्व आज जख्मी है. ऐसे ही लोगों के कारण हमारे अपने भारतीय इतिहास की कई शताब्दियाँ गहरे अंधकार में दफन रही है और ऐसे लोग नये भारतीय पुनर्जागरण के लिए भी सबसे बड़ा खतरा है.
    ऐसे लोगों की इस देश में कमी नहीं है जो अपने ईर्ष्यालु मालिकों के एक इशारे पर किसी भी नये उê2;्यम या नये विचार को नोंच नोंच कर उसकी बोटी बोटी अलग कर सकते है. इनके लिए असफलता और रोना धोना एक जीवन शैली है. इनकी दुनिया में हंसना मुस्कराना और नाच गाना ईशनिंदा के समान केवल मृत्यु योग्य अपराध है. हम तो पालने पोषित करनेवालों का लोकतन्त्र माँगने वाले लोग है. इसके लिए हमने काफी बड़ी कीमत चुकाई है.
    क्या हम इनसे अलग खड़े नहीं हो सकते?
    एड. दिनेश शर्मा

    ReplyDelete